सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जर एखाद्या कंपनीने बँकेचे कर्ज बुडवले, तर सरकारी जप्तीआधी बँकेला त्या कंपनीची मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करण्याचा पहिला अधिकार आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला.

Swapnil S

मुंबई : जर एखाद्या कंपनीने बँकेचे कर्ज बुडवले, तर सरकारी जप्तीआधी बँकेला त्या कंपनीची मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करण्याचा पहिला अधिकार आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. मालमत्ता आधी बँकेकडे अधिकृतपणे गहाण ठेवली होती, त्यामुळे ती विकून पैसे वसूल करण्याचा पहिला हक्क बँकेचाच आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

अपीलकर्त्या बँकेने २००९ ते २०१२ दरम्यान एका कंपनीला मोठे कर्ज दिले होते. त्या बदल्यात कंपनीने मालमत्ता बँकेकडे गहाण (तारण) ठेवली होती. कंपनीने बँकेचे पैसे परत केले नाहीत.

'तो' निर्णय रद्द

खंडपीठाने विशेष न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द केला आणि बँकेच्या बाजूने निकाल दिला. बँकेत असलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांपेक्षा बँकेचा पैसा वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

घर, शेती शर्तभंगासाठीचे हेलपाटे थांबणार; जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना नियमितीकरणाचे अधिकार, महसूल विभागाचा निर्णय

बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार

Mumbai : गोदरेज समूहाच्या वारसदाराने वरळीत खरेदी केली २९४ कोटींची लक्झरी घरे; तानिया दुबाश यांनी 'नमन झानामध्ये खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट्स

Mumbai : जन्म-मृत्यू, विवाह नोंदी काही सेकंदांत उपलब्ध होणार; BMC चा पथदर्शी उपक्रम

Mumbai : पीपीपी धोरणांतर्गत शाळांच्या भूखंडांचे वाटप रद्द करा! अमित साटम यांचे महापौर, आयुक्तांना पत्र