धावती ट्रेन पकडताना झालेला मृत्यू हा अपघातच! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट  प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

धावती ट्रेन पकडताना झालेला मृत्यू हा अपघातच! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेल एक्स्प्रेस पकडताना पडून झालेला मृत्यू हा अपघातच, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेल एक्स्प्रेस पकडताना पडून झालेला मृत्यू हा अपघातच, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना दिलासा दिला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने अनुचित घटनेची व्याख्या या अपघाताला लागू होत नसल्याने पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देता येणार नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा फेटाळून लावत पीडित कुटुंबाला ४ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.

लक्ष्मण राठोड आपल्या कुटुंबासह एक्स्प्रेस मेलने प्रवास करत होते. त्यावेळी एका स्थानकावर लघुशंकेसाठी राठोड फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेलमधून उतरले. मात्र अचानक ट्रेन सुरू झाली, तेव्हा धावती ट्रेन पकडताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडून ट्रेनखाली आले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेल्वे प्रशासनाने या अपघातात संपूर्णपणे त्या व्यक्तीचीच चूक असल्याचा ठपका ठेवत राठोड कुटुंबाला नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात पीडिताच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाच दार ठोठावले होते.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"