मुंबई

दादर येथील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरु

प्रतिनिधी

दादर येथील शंकर घाणेकर मार्गावरील अतिधोकादायक बनलेल्या जनार्दन अपार्टमेंट या सोसायटीमधील सहा इमारती शुक्रवार २४ व शनिवार, २५ जूनला पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, रहिवासी आपले घर खाली करत नसल्यामुळे सोमवार २७ जूनपासून ही कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ए इमारतीत रहिवासी नसल्याने त्यातीत आतील बाजूवर हातोडा मारण्यात आल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

मुंबईतील धोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र, अशा इमारती रहिवासी रिकाम्या करत नसल्यामुळे कारवाईमध्ये अडथळा निर्माण येत आहे. दादरमधील जनार्दन अपार्टमेंट मधील ए, बी,सी,डी, ई आणि जी या सहा इमारती अतिधोकादायक असल्यामुळे पालिकेने या इमारतीमधील मालक आणि रहिवाशांना नोटीस बजावली होती. त्यानुसार या इमारतीतील रहिवाशांनी आपल्या सदनिका तातडीने खाली करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. धोकादायक असलेल्या सहा इमारतीमध्ये ११५ सदनिका असून यात ५७५ रहिवासी वास्तव्यास होते. इमारती धोकादायक बनल्यामुळे इमारतींमधील सुमारे २०५ रहिवाशांनी टप्प्याटप्प्याने घर रिकामे केले. मात्र, आजही या इमारतींमधील ७४ सदनिकांमध्ये ३७० रहिवासी वास्तव्यास आहेत.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम