मुंबई

महिला उद्योगपतींची ड्युप्लेक्स खरेदी; वरळीच्या ‘नमन झना’ प्रकल्पात एकीने ६३९, तर दुसरीने मोजले २२५ कोटी

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तेथील साध्या घरांचे दर आता कोट्यवधींच्या घरात गेले आहेत. सर्वसामान्य माणसांना घर घेण्यासाठी आयुष्याची पुंजी लावावी लागते. घेतलेल्या कर्जाचे आयुष्यभर हप्ते फेडावे लागतात, तर याच मुंबई नगरीत शेकडो-कोटी रुपयांच्या घरांचे व्यवहारही सहजपणे होताना दिसत आहेत.

Swapnil S

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तेथील साध्या घरांचे दर आता कोट्यवधींच्या घरात गेले आहेत. सर्वसामान्य माणसांना घर घेण्यासाठी आयुष्याची पुंजी लावावी लागते. घेतलेल्या कर्जाचे आयुष्यभर हप्ते फेडावे लागतात, तर याच मुंबई नगरीत शेकडो-कोटी रुपयांच्या घरांचे व्यवहारही सहजपणे होताना दिसत आहेत. वरळीत एका नामवंत लक्झरी प्रकल्पात दोन महिला उद्योगपतींनी घरखरेदी केली आहे. त्यातील एका महिला उद्योगपतीने ६३९ कोटी रुपये मोजून अल्ट्रा लक्झरी प्रकल्पात ड्युप्लेक्स घेतले आहेत.

वरळीत ४० मजली ‘नमन झना’ हा आलिशान प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात यूएसव्ही लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्ष लीना तिवारी यांनी दोन ड्युप्लेक्स खरेदी केले आहेत. हे ड्युप्लेक्स ३२ ते ३५ मजल्यावर आहेत. प्रत्येक ड्युप्लेक्सचे क्षेत्रफळ १०४८.५ चौरस मीटर (बाल्कनीसहित) आहे. तसेच प्रत्येक ड्युप्लेक्स फ्लॅटला सहा कार पार्किंग मिळाले आहेत. हे पार्किंग बिल्डिंगच्या तळघरात व पोडियममध्ये आहे.

तिवारी यांच्यासोबतच गोदरेज समूहाच्या मुख्य ब्रँड ऑफिसर व कार्यकारी संचालक तान्या दुभाष यांनी याच टॉवरमध्ये २२५.८ कोटी रुपयांचा ड्युप्लेक्स खरेदी केला आहे.

मुंबईच्या लक्झरी मालमत्ता बाजारपेठेत महिलांचा प्रभावशाली खरेदीदार म्हणून पुढे येणे हे कदाचित सर्वात आश्चर्यकारक आहे. तिवारी आणि दुबाश दोघांनीही स्वतंत्रपणे अशा घरांमध्ये गुंतवणूक केली आहे जी केवळ लक्झरीच नाही तर स्वायत्तता, दूरदृष्टी आणि दर्जाचे प्रतीक आहेत. त्यांच्या खरेदीमुळे पारंपरिकपणे पुरुष खरेदीदारांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. महिला महागड्या घरांच्या व्यवहारांमध्ये विशेषतः भारताच्या आर्थिक राजधानीत, त्यांची उपस्थिती दर्शवत आहेत.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • हा टॉवर अत्यंत मोक्याच्या जागेवर आहे.

  • या टॉवरमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

  • दुहेरी उंचीचे छत, विस्तीर्ण राहण्याची जागा आणि भव्यता आदी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

  • या खास प्रकल्पात १६ घरे आहेत. त्यातील बहुतांशी विकली गेली आहेत.

  • हा प्रकल्प ‘श्री नमन समूहा’कडून विकसित केला जात आहे.

  • हा समूह मुंबईतील उच्चभ्रूंसाठी घरे बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे.

वरळीतील या कंपनीच्या प्रकल्पातील सर्व घरे लवकरच विकली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कंपनी संपूर्ण शहरात आपल्या कामाचा विस्तार करणार आहे.

या आलिशान घरासाठी तिवारी यांनी १५९.७५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क खरेदी भरले आहेत. या सर्व ड्युप्लेक्सचे एकत्रित खरेदी मूल्य ६३९ कोटी रुपये आहे. हा देशातील एक महागडा घर खरेदी व्यवहार ठरला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video