मुंबई

भटक्या कुत्र्यांवरून विधानसभेत चर्चा; बच्चू कडूंनी दिला सल्ला, नेमकं काय घडलं?

प्रतिनिधी

विधानसभेमध्ये आज भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी अनेक आमदारांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावर आमदार बच्चू कडू यांनी एक अजब सल्ला दिला. ते म्हणाले की, "भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावे," त्यांच्या या सल्ल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

विधानसभेत आज आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावर बच्चू कडू म्हणाले की, "रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये सोडा. तिकडे कुत्र्यांना किंमत असून ८ ते ९ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर आम्हाला कळले की, आपल्याकडे जसे बोकडाचे मास खाल्ले जाते, तिकडे कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. तेथील व्यापाऱ्यांना बोलवून यावर उपाययोजना करा, सध्या या गोष्टीची गरज आहे. एका दिवसांमध्ये यावर तोडगा निघेल. याचा उद्योग होण्यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. एकदाचा विषय संपवून टाका." असा सल्ला त्यांनी दिला.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम