@CMOMaharashtra
मुंबई

मराठा आरक्षणाबाबत शिंदे - फडणवीस सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळून लावली

नवशक्ती Web Desk

काल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळून लावली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांची तातडीने बैठक बोलावली. यामध्ये शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर ही माहिती दिली.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलावली होती.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार आहोत. तसेच, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागणार आहे. हा सर्वे करताना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेची असून या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे." अशी सूचना त्यांनी केली आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी