मुंबई

...म्हणजे फेरीवाले तुमच्या नियंत्रणात नाहीत! महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबईतील फुटपाथ फेरीवाल्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि महापलिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील फुटपाथ फेरीवाल्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि महापलिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. पालिका आणि पोलिस जबाबदारी झटकू पहात आहेत. असे असेल तर फेरीवाले तुमच्या नियंत्रणात नाहीत हे मान्य करा, अशा शब्दांत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने प्रशासनाला फटकारले. मुंबईतील गजबजलेल्या २० जागांवर अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले.

मुंबई शहर व उपनगरांतील रस्ते व फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी फेरीवाले अजूनही मुंबईतील रस्ते व फुटपाथ अडवून ठेवत असल्याची माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने संताप व्यक्त करून राज्य सरकारला जाब विचारला. यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

Bhiwandi Building Collapse : धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; महापौरांचे आदेश