मुंबई

Mumbai : भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने आमदार संतप्त

वानखेडे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने विधान परिषदेत आमदार संतप्त झाले.

Swapnil S

मुंबई : वानखेडे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या क्रिकेट सामन्याचे तिकीट न मिळाल्याने विधान परिषदेत आमदार संतप्त झाले. पोलीस आणि अधिकाऱ्यांना तिकीट मिळते, मग आमदारांना का नाही. पैसे घ्या, पण तिकीट मिळायलाच हवे, अशी मागणी करीत आमदारांनी विधान परिषदेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका केली.

भारत-इंग्लंड सामान्याची उपांत्य फेरीसाठीच्या लढतीची तिकीट न मिळाल्याची तक्रार विधान परिषदेत सभापतींकडे करण्यात आली. सचिन अहिर यांनी हा मुद्दा उपस्थित करताना भारत-इंग्लंड सामना मुंबईत होत आहे, याचा अभिमान आहे. मात्र पूर्वी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या काळात सदस्यांना पास दिले जात. आता मोठ्या कंपन्यांचे लोक स्टेडियममध्ये बसतात. पण आमदारांना पास मिळत नाहीत. सनदी अधिकारी आणि पोलिसांना तिकीट मिळतात. पण आमदारांना पास मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामना असताना आम्ही सदस्यांना तिकीट देतो तसेच येथेही आमदारांसाठी पासची व्यवस्था व्हायला हवी. अधिवेशन सुरू असताना सदस्यांना सामना पाहण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण