मुंबई

Raj Thackeray : "लोकशाही संस्थांची स्वायत्तता..." सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर काय म्हणाले राज ठाकरे?

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांसंदर्भात दिलेल्या निर्णयावर राज ठाकरेंसह (Raj Thackeray) आता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे

प्रतिनिधी

आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय सुनावला. यावेळी न्यायालयाने निर्देश दिले की, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि न्यायाधीश यांच्या समितीच्या सल्ल्यानुसार करावी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेशील स्वागत केले आहे.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत, "निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नवा कायदा होईपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करते. लोकशाही संस्थांची स्वायत्तता टिकायलाच हवी." अशा भावना व्यक्त केल्या.

सुप्रीम कोर्टात WhatsAppचा यू-टर्न; युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही, स्पर्धा आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी मान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला