मुंबई

MNS : "आदित्य ठाकरेंची चौकशी करा मग..."; या मनसे नेत्याने केला हल्लाबोल

मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज हल्ला झाल्यानंतर मनसेच्या नेत्याने थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली टीका

प्रतिनिधी

आज सकाळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला झाला. ४ जणांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टंपने हल्ला केला. मात्र, यावरून आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी तर थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करा, सर्व सत्य बाहेर येईल" अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर अमेय खोपकर म्हणाले की, "माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताबडतोब ताब्यात घ्यावे आणि चौकशी करावी." अशी टीका केली. ते म्हणाले की, "संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने हे सारखे पाठीमागून हल्ले करतात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा. जर काही तथ्य निघाले तर त्यांना तातडीने अटक करा. संदीप देशपांडे हा काही गप्प बसणारा माणूस नसून मुंबई पोलीस आणि प्रशासनाने त्यांना योग्य ती सुरक्षा द्यावी." अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, "आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. मर्द असाल तर पुढे या, पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. असे हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?" असा इशारादेखील अमेय खोपकर यांनी दिला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश