मुंबई

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा खोटा व्हिडीओ काँग्रेसने प्रसारित केल्याचा आरोप करत गुरुवारी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा खोटा व्हिडीओ काँग्रेसने प्रसारित केल्याचा आरोप करत गुरुवारी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मुंबईतील किल्ला कोर्ट परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. भाजप युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात सोनिया गांधींसह राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड या काँग्रेस नेत्यांच्या फोटोंवर शाईफेक केली. तसेच पेव्हर ब्लॉकने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. पोलिसांनी याप्रकरणी १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजयुमोचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी अचानक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या काचेच्या खिडक्या दगडाने फोडल्या, मोठे दगड कार्यालयावर भिरकावण्यात आले. खुर्च्यादेखील तोडण्यात आल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजयुमोचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी अचानक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या काचेच्या खिडक्या दगडाने फोडल्या, मोठे दगड कार्यालयावर भिरकावण्यात आले. खुर्च्यादेखील तोडण्यात आल्या.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत