संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : आजपासून समुद्राला मोठी भरती; ४ दिवस समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहा : BMC चे आवाहन; ४ महिन्यात १९ वेळा येणार भरती

मुंबईत २८ जूनपर्यंत सलग समुद्राला मोठी भरती येणार असून यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार असल्याचे सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत २८ जूनपर्यंत सलग समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यातील भरतीचा तपशील मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत.

चार दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच पालिकेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. शहरातील समुद्रकाठच्या रहिवाशांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

अशी आहे मोठी भरती :

-जून २०२५

बुधवार, दि. २५ दुपारी - १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७१

गुरुवार, दि. २६ दुपारी - १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७५

शुक्रवार, दि. २७ दुपारी - १.४० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७३

शनिवार, दि. २८ दुपारी - २.२६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६४

-जुलै २०२५

गुरुवार, दि.२४ सकाळी-११.५७ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५७

शुक्रवार, दि.२५ दुपारी-१२.४० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६६

शनिवार, दि.२६ दुपारी-१.२० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६७

रविवार, दि. २७ दुपारी-१.५६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६०

-ऑगस्ट २०२५

रविवार, दि. १० दुपारी - १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५०

सोमवार, दि. ११ दुपारी - १.१९ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५८

मंगळवार, दि. १२ दुपारी - १.५२ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५८

शनिवार, दि. २३ दुपारी - १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५४

रविवार, दि. २४ दुपारी - १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५३

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’