Mumbai : विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन ३ वर ₹२८० पासून अनलिमिटेड प्रवास 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन ३ वर ₹२८० पासून अनलिमिटेड प्रवास

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन)साठी नवीन सवलतीचे पास सुरू केले आहेत. ही योजना ८ एप्रिलपासून लागू झाली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईकरांसाठी प्रवास आणखी सोपा आणि परवडणारा करण्याच्या उद्देशाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन)साठी नवीन सवलतीचे पास सुरू केले आहेत. ही योजना ८ एप्रिलपासून लागू झाली आहे.

हे पास केवळ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)द्वारे उपलब्ध असून, डिजिटल आणि कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत

इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत मिळणार आहे. ४५ आणि ६० ट्रिपच्या पासवर ही सवलत लागू असून हे पास ३० दिवसांसाठी वैध असतील. त्यामुळे पालकांवरील खर्चाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

पर्यटकांसाठी खास सुविधा

मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी अनलिमिटेड प्रवास पास सुरू करण्यात आले आहेत.

  • १ दिवसाचा पास : २८० रुपये

  • ३ दिवसांचा पास : ७०० रुपये

यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणांना कमी खर्चात भेट देता येणार आहे.

इतर प्रवाशांनाही फायदा

नियमित प्रवाशांसाठी सध्याच्या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत.

  • ४५ ट्रिप पासवर १० टक्के सवलत

  • ६० ट्रिप पासवर १५ टक्के सवलत

तसेच, दिव्यांग प्रवाशांना दोन्ही पासवर २५ टक्के सवलत मिळणार आहे.

डिजिटल प्रवासाला चालना

ही योजना डिजिटल आणि कॅशलेस प्रवासाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. संपर्कविरहित (Contactless) प्रवास आणि भाडे पद्धतीमुळे अक्वा लाईन अधिक सोयीस्कर ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी