मुंबई

Mumbai : मध्य मुंबईत गुरुवार, शुक्रवार पाणी नाही

जी-दक्षिण विभागातील लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी तसेच जी उत्तर विभागातील दादर, माटुंगा येथे काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार

Swapnil S

मुंबई : तानसा (पूर्व) जलवाहिनीच्या दुरुस्तीकामासाठी गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजे १९ तास जी-दक्षिण विभागातील लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी तसेच जी उत्तर विभागातील दादर, माटुंगा येथे काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  

महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान एकूण १९ तासांसाठी दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान जी -दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्‍ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमोडल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

उमर खालीद, शरजील इमाम यांना जामीन नाकारला; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

ट्रम्प औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावणार; अमेरिकेतील औषधांच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता