@ANI
मुंबई

कंट्रोल रूमला फोने आला आणि म्हणाला मुंबईत पुन्हा ९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार

मुंबईमध्ये १९९३ साली जसे साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले, पुन्हा एकदा तसेच साखळी बॉम्बस्फोट येत्या २ महिन्यात होणार असल्याची फोनवरून धमकी

प्रतिनिधी

आज सकाळी पोलीस कंट्रोल रूमवर एका अज्ञात इसमाचा फोन आला आणि त्याने मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर संपूर्ण प्रशासन कमला लागले आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चोकशी करण्यात येत असून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या फोनवर १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यांनंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच, यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली करण्यासाठी बोलावले असून यामध्ये एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचा दावादेखल करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली होती. यासंदर्भात एटीएसला माहिती दिल्यानंतर २ पथके तयार करण्यात आली.

एटीएसच्या एका पथकाने ५५ वर्षीय नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला याला मालाड रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली. तो मालाडच्या पठाणवाडीमध्ये राहत होता. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमध्ये चोरी करणे, विनयभंग तसेच अतिक्रमण करणे असे १२ गुणे दाखल आहेत. २०२१मध्ये त्याला मालाड पोलिसांनी तडीपार केले असल्याची माहिती देण्यात येत आहे. अद्याप याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून त्याची चौकशी सुरु आहे.

पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामाधीन इमारत कोसळली; १५-२० कामगार अडकल्याची भीती, Video

KDMC रुग्णालयात शिवसेना नगरसेवकाची महिला डॉक्टरला मारहाण; घटना CCTV मध्ये कैद

Mumbai : रिव्हर्स घेताना बेस्ट बसची पादचाऱ्याला धडक; नियंत्रण सुटल्याने पार्क केलेल्या ३ वाहनांचे नुकसान, Video

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

Mumbai-Pune Railway : अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा; मुंबई-पुणे मार्गावर काही रेल्वेगाड्या पुन्हा धावल्या