मुंबई

मलेरिया डेंग्यू, कावीळने मुंबई आजारी

रुग्णसंख्येत आठवडाभरात १०० ते २००ने वाढ

नवशक्ती Web Desk

मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्येत आठवडाभरात १०० ते २०० ने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे टेंशन कायम आहे.

जून महिना कोरडा गेल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा फैलाव कमी होईल, असे वाटत होते; मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. १३ ऑगस्टपर्यंत मलेरिया - ४६२, डेंग्यू - ३१७, लेप्टो - १५१, गॅस्ट्रोचे - ४२९ रुग्णांची नोंद झाली होती; मात्र १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या सात दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ या साथीच्या आजारांमध्ये १०० ते १५० ने वाढ झाली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

१ ते २० ऑगस्टपर्यंत आढळलेले रुग्ण

मलेरिया - ७९४

लेप्टो - २२७

डेंग्यू - ४९५

गॅस्ट्रो - ६६०

कावीळ - ४८

स्वाईन फ्लू - १००

चिकनगुनीया - १४

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस