विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल 
मुंबई

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल

सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विक्रोळी स्थानकात मध्य रेल्वेच्या विशेष तपासणी मोहिमेत ४२१ विनातिकीट प्रवासी सापडले असून १ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. भांडूप स्थानकातही अशीच कारवाई करण्यात आली.

Mayuri Gawade

मुंबईच्या उपनगरी रेल्वेमधील विनातिकीट प्रवासावर लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विशेष 'फोर्ट्रेस' तपासणी मोहीम राबवण्यात आली. विक्रोळी आणि भांडूप स्थानकांवर झालेल्या या कारवाईत शेकडो विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सायंकाळी गर्दीच्या वेळी मोठी कारवाई

मध्य रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २३ मार्च रोजी सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत विक्रोळी स्थानकात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण ४२१ विनातिकीट प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून १,०३,८४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भांडूप स्थानकातही कारवाई

याच दिवशी भांडूप स्थानकातही अशाच प्रकारची तपासणी करण्यात आली. येथे सुमारे ३८० विनातिकीट प्रवासी सापडले असून, त्यांच्याकडून ९१,१६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या कारवाईनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी प्रतिक्रिया देत कर्जत, कसारा तसेच हार्बर मार्गावरील स्थानकांवरही अशा मोहिमा राबवण्याची मागणी केली. अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

महसूल संरक्षणासाठी विशेष मोहीम

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा विशेष तपासणी मोहिमांचा उद्देश रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना न्याय मिळवून देणे हा आहे.

मुंबईतील लोकल ट्रेन ही शहरातील सर्वात स्वस्त प्रवासाचे साधन असले तरी, विनातिकीट प्रवास आणि बनावट तिकीटांच्या घटना अजूनही चिंतेचा विषय असून, यावर कठोर कारवाईची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

'बँक ऑफ इंडिया'ला १ कोटी डॉलर्स देण्याचे नीरव मोदीला आदेश

भारत-अमेरिका व्यापार करारातील तरतुदींचा आढावा; शुल्क आकारणीतील अडथळे कमी करण्यावर भर

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद