मुंबई

ऐन उन्हाळ्यात मुंबईच्या काही भागात पाऊस; पुढच्या ३ दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

आज मुंबईसह ठाणे, पुण्यासह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या, हवामान खात्यानुसार पुढचे २४ तास महत्त्वाचे

प्रतिनिधी

आज मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावरून आता हवामान खात्याने महत्त्वाची बातमी दिली आहे. हवामान खात्यांच्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे असून येत्या काही दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, हवामान खात्याने गारपीटही होणार असल्याची माहिती दिली.

पुढील ३ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा ग्रामीण भागांमध्ये देण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचे आव्हान हवामान खात्याने केले आहे.

आज सकाळपासूनच मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात काल रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर ठाणे, दिवा,डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले. तसेच, १५ ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी