(संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

Mumbai : 'शेअर' रिक्षात महिलेचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने जखमी; दोघांना अटक

२९ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे राहत असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शेअर रिक्षात बसली होती.

Swapnil S

मुंबई : महिलेच्या विनयभंगप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. संजीव छतू राम आणि धीरजकुमार अयोध्याप्रसाद तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने या महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. यातील धीरजकुमारविरुद्ध सोळा वर्षांपूर्वी एक हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

२९ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे राहत असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शेअर रिक्षात बसली होती. यावेळी रिक्षात आधीच बसलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला; ती प्रचंड घाबरली. सांगूनही रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवल्याने तिने चालत्या रिक्षातून उडी घेतली. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली. घडलेला प्रकार तिने बोरिवली पोलिसांना सांगून रिक्षाचालकासह दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना काही तासांत संजीव राम आणि धीरजकुमार तिवारी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Mumbai : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम; बससेवा जवळपास ठप्प, प्रवाशांचे हाल

शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे हल्ले सुरूच; लेबनॉनमध्ये पाच जणांचा मृत्यू

NEET UG 2026 Re-Exam : नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबीत; पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशी NTA चा भोंगळ कारभार उघड

Mumbai : म्हाडा ॲक्शन मोडवर; ८६ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश

राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती