मुंबई

अतिधोकादायक इमारतीवर पालिकेची कारवाई म्हणाले...

विविध कारणे देत ११६ इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिनिधी

सी-वन, अर्थात अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करूनही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आले आहे. तर १०९ इमारतीतील रहिवाशांना इमारत रिकाम्या केल्या आहेत. तर विविध कारणे देत ११६ इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत ३३७ अतिधोकादायक इमारती असून, पावसाळ्यापूर्वी इमारत रिकामी करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने रहिवाशांना करण्यात येते; मात्र अन्य ठिकाणी घराचा पर्याय उपलब्ध नाही, दुसरे घर घेणे शक्य नाही, अशी विविध कारणे देत ११६ इमारतीतील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ११६ इमारतींचा प्रश्न प्रलंबित आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी चार प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात, ७० प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद