मुंबई

उद्धव ठाकरेंच्या कोकणातील सभेला स्थानिक लोक गैरहजर; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा

प्रतिनिधी

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी झाली असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठरकेंच्या सभेसाठी स्थानिक लोक गैरहजर होते, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

माध्यमांशी बोलताना भाजप नेते नारायण राणे म्हणाले की, " आधी शिवसेनेच्या सभा या मोठ्या होत होत्या. उद्धव ठाकरेंची सभा 'अरेंज' केलेली होती. सभेचे रूप विराट दाखवण्यासाठी खुर्च्या दूर-दूर लावल्या होत्या. या सभेला स्थानिक लोक नव्हते." असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "जनतेच्या प्रश्नांबद्दल उद्धव ठाकरेंना काय माहिती नाही, त्याला काय बोलता येतं. २.५ वर्ष सत्तेत असताना त्यांनी कोकणाला काय दिले?" असा सवाल नारायण राणेंनी केला. पुढे ते म्हणाले की, "अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना ते मंत्रालयात गेले नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. ज्यांची मंत्रालयात यायची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र पिंजून काढणार का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरले तरी काहीही फरक पडत नाही, उद्धवला सांगा, स्वत: जीभ सांभाळ," अशी टीका त्यांनी केली.

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!