मुंबई

राष्ट्रीय स्तरावरील 'आर्टिव्हल' कला प्रदर्शन ११ नोव्हेंबरपासून मुंबईत

३०० कलाकारांनी तयार केलेल्या सुमारे ३००० कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहता येणार

देवांग भागवत

राष्ट्रीय स्तरावरील 'आर्टिव्हल' कला प्रदर्शनाला येत्या ११ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. ११, १२ व १३ नोव्हेंबर रोजी मुंबई कफ परेड परिसरातील एक्स्पो वर्ल्ड ट्रेड सेंटर याठिकाणी 'आर्टिव्हल २०२२' ला सुरुवात होणार आहे. यामध्ये देशभरातील विविध क्षेत्रांतील ३०० कलाकारांनी तयार केलेल्या सुमारे ३००० कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहता येणार आहे.

या प्रदर्शनात कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीसाठी वेगवेगळी माध्यमे आणि तंत्रे वापरली आहेत. यामध्ये तेल, पाण्याचे रंग, ऍक्रेलिक रंग, कोळसा, पेस्टल, पेन आणि शाई, मिक्स मिडीयम, संगमरवरी, कांस्य, धातू, फायबर, लाकूड इ. वास्तववादी, अर्ध-वास्तववादी आणि अमूर्त शैलींचा समावेश आहे. तर कलाकृती सादरीकरणांमध्ये चित्रे, शिल्पे, कलाकृती, भित्तीचित्रे, प्रतिष्ठापने इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनात रसिकांना पारंपारिक, स्मारक, आध्यात्मिक, ऐतिहासिक वारसा ते लँडस्केप्स, समुद्रदृश्ये, शहरी आणि ग्रामीण शहरी दृश्ये, निसर्ग सौंदर्य, आदिवासी आणि लोककला आणि त्यांच्या आधुनिक आवृत्त्यांसह अनेक पैलू पाहायला मिळणार आहेत. कलाकारांना चांगले जागतिक पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून राज्यातील कलाकारांच्या वेगवेगळ्या चित्रशैली, विविध पैलू रसिकांना एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. या प्रदर्शनासाठी मुंबईतील चित्रकथी आर्ट गॅलरी, द इंडियन गॅलरी, आय क्वेस्ट गॅलरी, ऊर्जा द आर्ट गॅलरी यासोबत कोलकाता येथील आकार - अ कंटेम्पररी आर्ट, या कलादालनांचा समावेश आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

Thane : रिंग रोड मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुलभ होणार; १२ हजार कोटी रुपये खर्च

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत