मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही-अजित पवार

शिवसेनेच्या बंडाळीत भाजपचा कोणताही मोठा नेता हस्तक्षेप करतो आहे

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या बंडाळीत भाजपचा कोणताही मोठा नेता हस्तक्षेप करतो आहे, असे सध्या तरी दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार यांची बैठक बोलाविली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. आघाडी सरकारला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा कायम राहणार आहे. राज्यात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. संजय राऊत यांनी आघाडीबाबत जे विधान केले, हे त्यांच्या पक्षांतर्गत बाबींमुळे केले आहे. कदाचित गेलेले आमदार परत यावेत, यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्याबाबत आम्हाला कोणतीही टीकाटिप्पणी करायची नाही,’’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर