मुंबई

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण : ठेवीदारांकडून पुनरुज्जीवन किंवा विलीनीकरणाची मागणी

घोटाळ्याने बाधित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी आरबीआयने नेमलेल्या सल्लागार व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : घोटाळ्याने बाधित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी आरबीआयने नेमलेल्या सल्लागार व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी बँकेच्या पुनरुज्जीवन किंवा विलीनीकरणासाठी ठोस आराखड्याची तसेच ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण सुनिश्चित करण्याची मागणी केली, असे एका प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

NICB ठेवीदार फाउंडेशनने ठेवीदारांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी आणि १३ फेब्रुवारी २०२५ पासून आरबीआयने लादलेल्या निर्बंधांमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत रु. १२२ कोटींच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे.

फाउंडेशनचे अध्यक्ष टी. एन. रघुनाथा यांनी सांगितले की, ठेवीदारांचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी प्रभादेवी येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आरबीआयने नेमलेले सल्लागार रवींद्र चव्हाण आणि रवींद्र सप्रा यांची नुकतीच भेट झाली.

चर्चेदरम्यान सल्लागारांनी बँकेच्या भविष्यातील शक्यता बाबत सकारात्मक पण काळजीपूर्वक आशावादी दृष्टीकोन व्यक्त केला, असे रघुनाथा यांनी सांगितले.

सल्लागारांनी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या शक्यतांबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. त्यांनी यामध्ये संभाव्य विलीनीकरणाचाही विचार सुरू असल्याचे सांगितले, तरी याप्रकरणी सध्या तपशील सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, असे रघुनाथा यांनी सांगितले.

फाउंडेशनने सध्या प्रत्यक्षात असलेली २५,००० रुपयांची रकमेची काढण्याची मर्यादा वाढवून ती प्रति खातेदार १.५ लाख रुपये करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार