मुंबई

अबू सालेमच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस

१९९३ मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या गँगस्टर अबू सालेमने उर्वरित शिक्षा माफ करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : १९९३ मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या गँगस्टर अबू सालेमने उर्वरित शिक्षा माफ करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सालेमने २५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. आता माझी तुरुंगातून सुटका करा, अशी विनंती त्याने केली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अबू सालेमच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सालेमच्या वकिलांनी याचिकेतील विविध मुद्दे खंडपीठाच्या निदर्शनास आणले. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार सालेमने २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवू नये. करारामध्ये तसे म्हटलेले आहे.

ई-रिक्षा व ई-बाइकसाठी परवाना बंधनकारक; मोटार वाहन विभागाकडे करावी लागणार नोंदणी

इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार

Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक

बेकायदेशीर धर्मांतराला चाप; विधानसभेत विधेयक सादर; आरोप सिद्ध झाल्यास सात वर्षे कारावासाची शिक्षा

भारतात 'उष्ण रात्रींचे' संकट गडद; देशातील ७०% जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढला