संग्रहित छायाचित्र 
मुंबई

बेकायदा बांधकामांना अधिकारीच जबाबदार; हायकोर्टाने काढली BMC ची खरडपट्टी: "कारवाईचा बडगा उगारा, पगारवाढ रोखा"

मुंबई शहर अणि उपनगरात वाढत्या बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करताना पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली.

Swapnil S

मुंबई : मुंबई शहर अणि उपनगरात वाढत्या बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करताना पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली. बेकायदा बांधकामांवर अंकुश ठेवणारे पालिका अधिकारी काय करतात? कर देणाऱ्या जनतेच्या पैशातून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे की नाही? असा सवाल खंडपीठाने विचारला व या सर्व गैरप्रकारांना केवळ पालिका अधिकारीच जबाबदार आहेत, असे स्पष्ट करीत या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारा, असे तोंडी आदेश दिले.

बेकायदा बांधकामांविरोधात तक्रार करूनही पालिका कारवाई करीत नाही, याकडे लक्ष वेधणाऱ्या याचिकेची न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी चार वर्षे उलटूनही पालिका अधिकारी कारवाई करीत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

याची गंभीर दखल खंडपीठाने घेत महापालिकेची चांगलीच झाडाझडती घेतली. असे एकच प्रकरण न्यायालयासमोर नाही, अनेक प्रकरणात पालिकेची अनास्था समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिक बेकायदा बांधकामासंबंधी तक्रार दाखल करतो. परंतु, पालिका त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करीत असल्याचे आढळून येत नाही. काही मोजक्या तक्रारींत कारवाई होते. मात्र, एखाद्या जमीनदाराने जर तक्रार केली, तर हेच अधिकारी तत्परता दाखवत २४ तासांत बुलडोझर घेऊन घटनास्थळी हजर होतात आणि कामाची तत्परता दाखवतात. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात न घेता ढिम्म राहण्याची पालिकेची भूमिका म्हणजे बेकायदा बांधकामांना दिलेले प्रोत्साहन आहे. त्यामुळेच अशी बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत.

कारवाईचा बडगा उगारा, त्यांची पगारवाढ रोखा!

या बेकायदा बांधकामांना पालिकेचे अधिकारी तेवढेच जबाबदार आहेत, असे मत खंडपीठाने व्यक्त करताना या अधिकाऱ्यांचा समाचार घेतला पाहिजे. बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यास अकार्यक्षम असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, त्यांची पगारवाढ रोखा, काही कालावधीनंतर त्यांची अन्य ठिकाणी बदली करा, असे तोंडी आदेशही खंडपीठाने पालिकेला दिले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव