मुंबई

ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू ; उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे, त्यांचेही काम सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य सुप्रीम कोर्टात गेले त्याच धर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आमचं म्हणणं मांडणार आहोत. ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी बांठिया समिती नेमली आहे. मध्यप्रदेशने काय दाखल केले, तेही पाहिले आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळायला हवे, यासाठी प्रयत्न सुरुच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहात विधेयक पास झाले होते. विरोधकांनीही पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे कारवाया झाल्या. राज्यपालांनीही विधेयकावर तत्काळ सही केली. त्यामुळे मध्यप्रदेशप्रमाणे न्यायव्यवस्थेसमोर आमची बाजू प्रभावीपणे मांडू. त्यासाठी तज्ज्ञ वकीलांची टीम देण्यात आली आहे. आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेला तो अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी