मुंबई

उघडे मॅनहोल खपवून घेतले जाणार नाहीत!हायकोर्टाने पालिकेला सुनावले

पावसाळ्यापूर्वी उघडी मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या, अशा शब्दांत पालिकेला खडे बोल सुनावले

नवशक्ती Web Desk

मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील उघडे मॅनहोल सुरक्षित ठेवण्याची जबादारी ही महापालिकेचीच आहे. ते उघडे ठेवल्याचे खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी उघडे मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या. अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला खडे बोल सुनावत मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी अंमलात आणणार्‍या उपयायोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले.

वांद्रे पश्चिम येथील १६व्या रस्त्यावर ४ मॅनहोल उघडी असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या मॅनहोल संदर्भात हायकोर्टने पाच वर्षांपूर्वी २०१८ला दिलेल्या आदेशांची पूर्तता होत नसल्याने अॅड रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने पालिकेच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली. यापूर्वी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत. याची आठवण खंडपीठने पालिकेला करून दिली. उघडे ठेवल्याचे खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी उघडी मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या, अशा शब्दांत पालिकेला खडे बोल सुनावले. दरम्यान, खंडपीठाने पुढील सुनावणी ८ जून रोजी निश्चित केली.

NEET UG 2026 Re-Exam : नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबीत; पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशी NTA चा भोंगळ कारभार उघड

Mumbai : म्हाडा ॲक्शन मोडवर; ८६ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश

राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

रिलायन्समधील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुकेश अंबानी यांच्याकडून नव्या पिढीकडे सूत्रे सुपूर्द