मुंबई

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट आलेली आहे. सोमवारीही या परिसराला उष्णतेचा तडाखा बसणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट आलेली आहे. सोमवारीही या परिसराला उष्णतेचा तडाखा बसणार आहे. सोमवारी मुंबईत तापमानाचा पारा ३९ अंशावर जाईल, तर पनवेल, कल्याण, अंबरनाथ, नेरळ येथे ४४ अंश तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी मुंबईत कमाल ३८.१ अंश तापमान नोंदवले गेले. सर्वसाधारण तापमानापेक्षा हे प्रमाण ४.४ अंशाने अधिक होते. तर हवेतील आर्द्रता ४० व ६१ टक्के नोंदवली गेली, असे सांताक्रूझ वेधशाळेने सांगितले. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे ३४.४ अंश तापमान नोंदवले गेले. ३० एप्रिल रोजी ३७ अंश, तर बुधवारी ३५ अंश तापमान असणार आहे. २ मे रोजी तापमान ३४ अंश असेल. मुंबईत ३७ अंशापेक्षा जास्त तापमान आढळल्यास उष्णतेची लाट जाहीर केली जाते. कारण सर्वसाधारण तापमानापेक्षा हे तापमान ४.५ अंशांनी जास्त आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना सुती कपडे परिधान करावेत, छत्री, टोपी घालावी. थेट सूर्यप्रकाशात येऊ नये. सतत पाणी पित राहावे, असे हवामान खात्याने सांगितले.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही फैसला

मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करीच्या नव्या 'जुगाड'चा पर्दाफाश! ₹२.१५ कोटींचे सोने जप्त, बांगलादेशी प्रवाशासह एक कर्मचारी अटकेत

ट्रेनमधून उतरवले, ५ तास ताटकळले! देशातल्या आघाडीच्या ॲथलिट्ससोबत पनवेल स्टेशनवर गैरवर्तनाचा Video व्हायरल

'राईचा पर्वत करू नका…'; घटस्फोटाच्या चर्चांवर नेहा कक्करचं स्पष्टीकरण; म्हणाली, माझ्या नवऱ्याला...

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार