मुंबई

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार;मुंबईतील बसस्थानकांवर ई-बाईकची सुविधा उपलब्ध

बेस्ट बसमधून उतरल्यावर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वोगो कंपनीच्या माध्यमातून ई-बाईक सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे

गिरीश चित्रे

बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडणे, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबर बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व टिकवण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विविध उपाययोजना सुरू आहेत. आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी मुंबईतील बसस्थानकांवर ई-बाईकची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.

बेस्ट बसमधून उतरल्यावर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वोगो कंपनीच्या माध्यमातून ई-बाईक सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अंधेरी येथे पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील बसथांब्यावर ई-बाईक सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. ई-बाईकची सगळी जबाबदारी संबंधित कंपनीची असून, यामुळे बेस्ट प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. सोयीस्कर व्हावे, यासाठी ई-बाईक सेवा सुरू करण्यात येत आहे, असे लोकेश चंद्रा यांनी सांगितले. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह उत्पन्न व प्रवासीसंख्या वाढीसाठी बसेसचा ताफा वाढवण्यात येत आहे. सध्या ३,७०० बसेस असून २०२७ पर्यंत १९ हजार बसेस ‘बेस्ट’च्या ताफ्यात सामील होतील. तर २०२३पर्यंत सहा हजार ८०० बसेसचा ताफा असेल. यापूर्वी १ कोटी ७० लाख रुपये दैनंदिन उत्पन्न मिळत होते; मात्र सद्य:स्थितीत रोज २ कोटी २५ लाख रुपये महसूल मिळतो, अशी माहिती चंद्रा यांनी दिली. बेस्ट उपक्रमाला स्वतःची बस चालवण्यासाठी प्रति किलोमीटर १४० रुपये खर्च येतो; परंतु भाडेतत्त्वावरील बसेससाठी हाच खर्च ४६ रुपये येतो. तसेच भाडेतत्त्वावरील बसेसची जबाबदारी कंत्राटदाराची असून चालक, देखभालीचा खर्च कंपनीलाच करावा लागतो.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक