मुंबई

पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थाचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी केले आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

नवशक्ती Web Desk

आज मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत अन्य विद्यार्थ्यांनी केला. याच प्रकरणी जाब विचारात त्यांनी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद केली. तसेच, रुग्णालयातील प्रशासनाविरोधात त्यांनी निदर्शने केली.

मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेद रुग्णालयात बीएएमएसला शिकणाऱ्या २२ वर्षीय दयानंद काळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रात्री आंब्याच्या झाडावरून पडून दयानंद काळेच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी त्याला पोद्दार आयुर्वेद रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील सेवा अभावी आणि तेथील प्रशासनाने तत्परता दाखवली नसल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या सोबत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यांचे म्हणणे आहे की, जखमी विद्यार्थ्यासाठी रुग्णालयातील प्रशासन साधी ऍम्ब्युलन्सही उपलब्ध करू शकले नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या विद्यार्थ्याचा बळी गेला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा