Mumbai : पवई तलावात १ ऑक्टोबरपासून सांडपाणी सोडणे होणार बंद; पुनर्विकासासाठी १.८५ कोटींचा खर्च  
मुंबई

Mumbai : पवई तलावात १ ऑक्टोबरपासून सांडपाणी सोडणे होणार बंद; पुनर्विकासासाठी १.८५ कोटींचा खर्च

पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी येत्या १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

Swapnil S

मुंबई : पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी येत्या १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. पवई तलाव व परिसराच्या पुनर्विकासासाठी ‘एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड’ या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागाराला १ कोटी ८५ लाख रुपये मुंबई महापालिका मोजणार आहे.

सध्या पवई तलावात दररोज सुमारे १८ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी मिसळत आहे. तलावात येणारे १८ सांडपाणी निचरा बिंदू (आऊटफॉल्स) अडवून हे पाणी वळविण्याचे काम सुरू असून ३० जूनपर्यंत ते पूर्ण होईल. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून पवई तलावात कोणतेही सांडपाणी जाणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

महापालिका अधिकारी, तसेच आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने सर्व आऊटफॉल्सची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.

पवई तलावालगतच्या आदी शंकराचार्य मार्गावरील परिसराच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी ‘एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड’ची नियुक्ती करण्यात येत असून, या कामात ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ आणि आयआयटी, मुंबई यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. प्रकल्पाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समितीही स्थापन केली जाणार आहे.

Mumbai : वायू गुणवत्ता सेन्सरचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; लेखापरीक्षणासाठी १३ कोटींचा खर्च

Mumbai : केईएम रुग्णालयाला अखेर नवीन एमआरआय मशीन मिळणार; BMC च्या चार मोठ्या रुग्णालयांसाठी एमआरआय यंत्रे खरेदी

Pune : गणेशोत्सवानिमित्त यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती; दगडूशेठ गणपतीसमोर राधा-कृष्णाच्या दिव्य प्रेमाचा आध्यात्मिक प्रवास

Thane : पहिली वातानुकूलित डबलडेकर बस अखेर रस्त्यावर; चार्जिंग सुविधेच्या समस्येनंतर पर्यायी व्यवस्था, सर्कल-भाईंदरपाडा मार्गावर धावली

भारतीयांचा स्विस बँकांमधील पैसा आटला; निधीमधील घसरणीचा फटका; वर्ष २०२५ मध्ये बँकेतील ठेवी ८ टक्क्यांहून अधिक घसरल्या