मुंबई

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करा; मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजन, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, समितीचे समन्वयक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले की, प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. याबरोबरच नव मतदारांच्या नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस