मुंबई

Mumbai : 'त्याने 'दाढीवाल्या' व्यक्तीला दोनदा गोळ्या घातल्या'; RPF कॉन्स्टेबल प्रकरणात तरुणीची न्यायालयात साक्ष

आरोपीने दोनदा गोळी झाडल्यानंतर "दाढीवाली" व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली, अशी साक्ष एका साक्षीदाराने सोमवारी न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : आरोपीने दोनदा गोळी झाडल्यानंतर "दाढीवाली" व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली, अशी साक्ष एका साक्षीदाराने सोमवारी न्यायालयात दिली.

चालत्या ट्रेनमध्ये चार जणांना जुलै २०२३ मध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने ठार मारल्याच्या घटनेबाबतची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. गोळीबाराच्या दिवशी तिच्या मैत्रिणीसोबत प्रवास करणाऱ्या २९ वर्षीय साक्षीदाराने डोळ्यांसमोर घडलेल्या प्राणघातक हल्ल्याची कहाणी सांगितली. रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) माजी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यांच्यावर ३१ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये वरिष्ठ सहकारी, सहाय्यक उपनिरीक्षक आणि तीन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे.

काही काळानंतर त्यांना रुळांजवळ अटक करण्यात आली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले.बोरिवली न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. पठाण यांच्यासमोर साक्ष देताना साक्षीदाराने सांगितले की, ती सकाळी ५.३० च्या सुमारास उठली आणि तिला एका पेंट्री कारमधून एक व्यक्ती बाहेर पळताना दिसली. त्याच्या मागे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल होता.

मी आरपीएफ जवानाला (चौधरी) विचारले की काही घडले आहे का? तो फक्त रागाने माझ्याकडे पाहत राहिला आणि मी माझ्या सीटवर शांतपणे बसले, असे तिने न्यायालयाला सांगितले.महिलेने सांगितले की, तिचा मित्र वॉशरूमला जाण्याच्या तयारीत होता. परंतु आरपीएफ कॉन्स्टेबल त्याच्या जवळ उभा राहिल्यानंतर कॉन्स्टेबलने तिला जाण्यास सांगितले. यानंतर कॉन्स्टेबलने तिच्या मित्राकडे पाहिले आणि त्यांना त्यांच्या जागी परत जाण्यास भाग पाडले गेले.

साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले की, दोन वेळा त्यांच्या डब्यात फिरल्यानंतर आरोपी एका दाढीवाल्या माणसाजवळ गेला आणि त्याच्याशी वाद घालू लागला. त्याने (चौधरी) त्या माणसाला दोनदा गोळ्या घातल्या आणि नंतर तिने तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला, असे अतिरिक्त सरकारी वकील सुधीर सपकाळे यांनी चौकशी करताना सांगितले. हल्ल्यानंतर घाबरलेल्या महिलेने बचाव पक्षाचे वकील जयवंत पाटील यांना उसांगितले की, ती त्या व्यक्तीला गोळी मारण्यात आली त्या ठिकाणाजवळ गेली नाही.

तपोवन वृक्षतोडीबाबत चर्चा ठरली निष्फळ; प्रशासन-पर्यावरणप्रेमी आपापल्या मुद्द्यांवर ठाम

Navi Mumbai : सानपाड्यात परदेशी तरुणाच्या मृत्यूने खळबळ; पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळले

Thane : मुलाच्या जन्मानंतर खर्च वाढल्यामुळे पत्नीला घरातून हाकलले; पतीवर गुन्हा दाखल

Pune : भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; २ हजार अर्जांचे वाटप

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी? अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती