मुंबई

बारसु आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

रिफायनरीविरोधात बारसूमध्ये ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केले, यानंतर ३ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले

नवशक्ती Web Desk

काही दिवसांपूर्वी बारसूमध्ये रिफायनरी विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यानंतर ३ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत ट्विट करत माहिती दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटले की, "बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते." यांनतर मात्र चर्चांना उधाण एकीकडे आंदोलकांनी मातीपरीक्षण थांबवून चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. तर, यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की, माती परिक्षण होणार असून ५ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आहे." अशी माहिती दिली आहे.

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार