मुंबई

आंदोलनामुळे लांबणार दहावी बारावीचे निकाल; तब्बल इतक्या उत्तरपत्रिका तपासाविना पडून

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. एकीकडे याचा फटका हा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहेत, तर दुसरीकडे अनेक शिक्षक संघटनांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसत आहे. यामुळे आता दहावी बारावीचे निकाल लांबणीवर जाणार असल्याची शक्यता आहे. कारण या संपामुळे तब्बल ७५ लाख उत्तरपत्रिका पडून राहणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावी बारावीचे निकाल आठवडाभर पुढे जाण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनीही बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला असून बारावीच्या परीक्षा संपत आल्या आहेत. तर, दहावीचे आणखी ३ पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता राज्य शासन यासंदर्भात पुढे काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'भटकती आत्मा' पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर टीका; शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे प्रत्युत्तर

'काँग्रेस'चा संपत्तीच्या फेरवाटपाचा घातक खेळ

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर...

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल