मुंबई

यंदा केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील; दोन मतदान अधिकाऱ्यांचे आपल्या निर्वाचन अधिकाऱ्याबाबत पत्र

निवडणुकीचे काम म्हणजे मतदान अधिकाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याचा समज आजवर प्रस्थापित आहे. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध जबाबदारी पार पाडलेल्या दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी हा समज खोडून काढला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील निर्वाचन अधिकाऱ्यांचे कौतुक करत २०२४ ला केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील, असा अनुभव या दोन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : निवडणुकीचे काम म्हणजे मतदान अधिकाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याचा समज आजवर प्रस्थापित आहे. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध जबाबदारी पार पाडलेल्या दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी हा समज खोडून काढला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील निर्वाचन अधिकाऱ्यांचे कौतुक करत २०२४ ला केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील, असा अनुभव या दोन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आपल्या निर्वाचन अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करणारे पत्र या दोन अधिकाऱ्यांनी लिहिले आहे.

रश्मी ली जॉर्ज या सेंट झेवियर्स महाविद्यालयाशी संलग्न आहेत. राजी बाबू हे एलआयसीमध्ये काम करतात. या दोन अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघात काम केले. यावेळी एसआरएचे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील हे मुंबादेवी मतदारसंघात निर्वाचन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मुंबादेवी मतदारसंघात शांततापूर्ण मतदान होण्यासाठी निर्वाचन अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची रश्मी ली जॉर्ज आणि राजी बाबू या दोघांनी स्तुती केली. तसेच पहिल्यांदाच निवडणुकीचे काम करून आनंदाने बाहेर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकीतील अनुभव त्यांच्यासाठी वेगळा होता. निर्वाचन अधिकारी असलेले पाटील यांच्या सूचना, नियोजन, दृष्टिकोन याचे या दोघांनीही कौतुक केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. यावेळी ६.३ करोड मतदारांनी मतदान केले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश