मुंबई

जीएसटी करार जुलै अखेरीस संपुष्टात येणार,मुंबई महापालिका चिंतेत

जकात बंद केल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

प्रतिनिधी

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जकात बंद झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य कर ( जीएसटी) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ५ वर्षांसाठी झालेला करार जुलै अखेरीस संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेला राज्य सरकारकडून जीएसटीचे पैसे मिळणार का, अशी चिंता मुंबई महापालिकेला सतावत आहे.

मुंबई महापालिकेचे मुख्य स्रोत जकात होते. मात्र जकात बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जकात बंद केल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील महानगर पालिका, नगर पालिकांना जीएसटीचे पैसे देण्याचा करार ५ वर्षांसाठी केला आहे. जुलै अखेरीस हा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला पैसे दिले नाही, तर राज्य सरकार मुंबई महापालिकेला पैसे कसे देणार, अशी चिंता मुंबई महापालिकेला सतावत असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mumbai : प्रतीक्षा संपली! मृणालताई गोरे उड्डाणपूल ६ जूनपासून सुरू; पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ट्रॅफिक कमी होण्याची शक्यता

Mumbai Rain : पावसाच्या हलक्या सरींमध्येच अंधेरी सबवे पाण्याखाली; BMC च्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

शरीरावर ९१ जखमा, ७ बरगड्या मोडल्या; दीड वर्षांच्या चिमुकल्यावर आईच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अमानुष अत्याचार