मुंबई

वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीची चौकशी सुरू

वांद्रे टर्मिनसवर एक्स्प्रेस पकडताना शनिवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १० प्रवासी जखमी झाले होते.

Swapnil S

मुंबई : वांद्रे टर्मिनसवर एक्स्प्रेस पकडताना शनिवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १० प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. आता रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

शनिवारी पहाटे २.४५च्या सुमारास वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर प्रचंड गर्दी उसळली होती. ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ती पकडताना लोकांनी धाव घेतली. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. ही एक्स्प्रेस प्रवाशांनी खच्चून भरली होती. तरीही सकाळी ५.१० वाजता निर्धारित वेळेनुसार ही ट्रेन सोडण्यात आली. दिवाळी आणि छटपूजेनिमित्त गावी उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती.

“या अपघाताची चौकशी आम्ही सुरू केली आहे. अपघातावेळी टर्मिनसवर पोलीस आणि रेल्वे संरक्षण दल उपस्थित असतानाही, प्रवाशांची इतकी गर्दी कशी जमली, याचा तपास सुरू आहे,” असे रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. इंद्रजित साहनी (१९) आणि नूर मोहम्मद शेख (१८) हे गंभीर जखमी असून १० जखमींपैकी तीन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video