ANI
मुंबई

आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारीत मार्गी लागेल- दीपक केसरकर

ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात मार्गी लागेल. फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी असेल त्याबाबत समाजाने निशंक राहावे-दीपक केसरकर

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा आरक्षणाचा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात मार्गी लागेल. फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी असेल त्याबाबत समाजाने निशंक राहावे. सरकार सकारात्मक असून, सर्व प्रयत्न करीत असताना मुंबईत येवून आंदोलन छेडणे समाजाच्या व राज्याचे हिताचे नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलन करण्याच्या आपल्या भुमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईकडे निघाले असून, २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाजानेही मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट करत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

आतापर्यत झालेले काम हे मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे ७० वर्षात जे काम कोणीही केले नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केले आहे याची मराठा समाजाने आवर्जुन नोंद घ्यावी, असे सांगून दीपक केसरकर म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यत ३२ हजार कुणबी नोंदी आढळुन आलेल्या आहेत. त्यापैकी २४ हजार मराठा बांधवांना मराठा कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत. ३२ हजार नोंदीच्या आधारे १३ ते १४ लाख बांधवांना कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत