मुंबई

परिवहन विभागाच्या बसेसची संख्या पोहोचली ७२ हजारच्या वर

एकेकाळी २५ हजारावर असणारी प्रवाशी संख्या आताही २१ जून रोजी मंगळवारी ७२ हजार ५२१ पर्यंत गेली आहे

प्रतिनिधी

भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेसमधून प्रवाशी संख्या ७२ हजारच्या वर पोहोचली आहे. पालिकेच्या एकूण ७४ बसेस पैकी ७० बस चालू आहेत म्हणजेच ९५ टक्के बस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. शहरात दररोज एकूण रोजच्या - रोज ७९९ फेऱ्या आहेत त्यापैकी ७९२ ते ७९८ फेऱ्या बसेस पूर्ण करत असतात. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नियोजन कामामुळे एकेकाळी २५ हजारावर असणारी प्रवाशी संख्या आताही २१ जून रोजी मंगळवारी ७२ हजार ५२१ पर्यंत गेली आहे. त्यातच १०६१ पास धारक सुद्धा आहेत. बसची देखभाल दुरुस्ती व साफसफाई योग्य प्रकारे निगा राखल्यानेच व वेळेवर बस सुटत असल्याने तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात परिवहनच्या बसेसचा फायदा पोहोचत असल्यानेही प्रवाशी संख्या वाढण्यात मदत होत आहे.

परिवहन ठेकेदार हा स्वतः गाड्यांचे मेंटेनन्स बघत असल्याने गाड्यांची दुरुस्ती व्हायलाही वेळ लागत नाही आहे. त्यासोबत पालिकेनि भविष्यात शहरांसाठी पर्यावरण पूरक अश्या इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे नियोजन केल्याने त्या बस पालिका सेवेत लवकरात लवकर आल्यास सुद्धा प्रवाशी संख्या वाढण्यात पालिकेला यश येणार आहे.

पालिका परिवहन विभागामार्फत सामाजिक बांधीलकी जपत पालिका दररोज ७२ हजारच्या वर तिकीट विक्री करत त्यातून दररोज आठ ते नऊ लाख रुपयांची कमाई सुद्धा करत आहे. आता पालिकेकडे एकूण ७४ बसेस असून ६९ साध्या बसेस व असून पाच एसी असे आहेत.

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या ६ तास मुंबई विमानतळ बंद; अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

रुळ ओलांडणं ठरलं जीवघेणं! भरधाव एक्स्प्रेसखाली दोन महिलांचा चिरडून मृत्यू; थरारक घटना CCTV मध्ये कैद

पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधर-अमृतसरच्या लष्करी परिसरात दुहेरी स्फोट; CCTV फुटेज व्हायरल

नागरिकांना जमिनीच्या मोबदल्याशिवाय वंचित ठेवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुण्यात महिला असुरक्षित, गृहमंत्र्यांनी डोळे बंद केलेत का? उद्धव ठाकरेंच्या भगिनी कीर्ती फाटक यांचा संताप; पोलीस आयुक्तांची घेतली भेट