मुंबई

मंत्रिमंडळ विस्‍ताराचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्‍यता

राज्‍यात सध्या फक्‍त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच मंत्रिमंडळ आहे.

प्रतिनिधी

तब्‍बल २४ दिवसांनंतरही अद्याप राज्‍यातील मंत्रिमंडळ विस्‍तार होऊ शकलेला नाही. त्‍यावरून आता विरोधी पक्षांकडूनही सरकारवर टीकास्‍त्र सोडले जात आहे; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी एकटेच दिल्‍ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्‍यान त्‍यांची पक्षश्रेष्‍ठींशी चर्चा झाल्‍याचे समजते. त्‍यामुळे आता मंत्रिमंडळ विस्‍ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे.

राज्‍यात सध्या फक्‍त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच मंत्रिमंडळ आहे. २४ दिवस उलटले तरी अद्याप विस्‍तार झालेला नाही. विरोधी पक्षाकडून तर टीकास्‍त्र सोडले जात आहेच; पण भाजप तसेच शिंदे गटामधील आमदारांमध्येदेखील उत्‍सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्‍तारामागे न्यायालयीन खटल्‍याची कोणतीही अडचण नसल्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्‍पष्‍ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्‍तार दोन टप्प्यात होणार असल्‍याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्‍ली दौऱ्याला महत्त्व आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्‍यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद बोलावली होती. बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्‍थित होते. पक्षाच्या सुशासन धोरणावर या बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बैठकीत उपस्‍थितांना विकास कामांबाबत मार्गदर्शन केले.

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न