मुंबई

तेरा वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस अटक

अटकेसाठी पोलीस पथक नाशिक, हिंगोली, परभणी, जालना, केरळ राज्यात गेले होते

नवशक्ती Web Desk

मुंबई : पॅरोलवर सुटल्यानंतर तेरा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या अशोक हनुमंता कजेरी या आरोपीस अखेर तेलंगणा येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी धारावी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. अशोक हा गेल्या तेरा वर्षांपासून नाव बदलून तसेच वेशांतर करुन तेलंगणा येथे वास्तव्यास होता , असे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. २००७ साली धारावी परिसरात झालेल्या हत्येच्या गुन्ह्यांत अशोक कजेरीला धारावी पोलिसांनी अटक केली.

याच गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याला २००८ साली विशेष सेशन कोर्टाने हत्येच्या गुन्ह्यांत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. २०११ साली त्याला तीस दिवसांच्या पॅरोलवर सोडून देण्यात आले होते; मात्र पॅरोलची मुदत संपूनही तो कारागृहात न जाता पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात २२४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक नाशिक, हिंगोली, परभणी, जालना, केरळ राज्यात गेले होते.

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

"दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..."; अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांची भावूक पोस्ट

Mumbai : उद्यापासून ९ दिवस रंगणार 'काळा घोडा' कला महोत्सव; फ्री पास कसा मिळवाल? जाणून घ्या

भाईंदर उड्डाणपुलाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज; कथित अतिविद्वानांच्या बोलघेवडेपणामुळे दिशाभूल आणि गोंधळ

जिल्हा परिषद निवडणूक : NCP उमेदवाराच्या अर्जाला विरोध करणाऱ्या BJP उमेदवाराला HC चा दणका; एक लाखाचा दंड, याचिकाही फेटाळली