मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये ‘तिरंगा रॅली’ 
मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये ‘तिरंगा रॅली’

पालिकेच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये शनिवारी तिरंगा रॅली पार पडली. यात पालिका शाळांमधील ६३ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.

Swapnil S

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. पालिकेच्या वतीनेही संपूर्ण मुंबई महानगरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पालिकेच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये शनिवारी तिरंगा रॅली पार पडली. यात पालिका शाळांमधील ६३ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.

'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मुंबईमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, मानवंदना सोहळा, तिरंगा मेळा आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

घरोघरी मोफत तिरंगा वाटप

पालिकेतर्फे सध्या ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेनिमित्त घरोघरी मोफत तिरंगा वाटप करत आहे. तसेच विभागांमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा दौड, सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी १२ लाख रुपये, शिक्षण विभागाला ५२ लाख रुपये आणि तिरंगा खरेदीसाठी वेगळा निधी खर्च केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी