संग्रहित छायाचित्र PC : (X) @AkshayAkkiFan
मुंबई

टोरेस घोटाळ्याप्रकरणी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; कार्यालयासह आरोपींच्या घरातून अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त

दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले, तर दोन पथक तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या गुन्ह्यात दोन मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून गुरुवारी पोलिसानी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी टोरेस कंपनीच्या चार शाखेसह दोन महिला आरोपींच्या घरात छापा टाकून पोलिसांनी अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त केली आहे.

याकरिता दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले, तर दोन पथक तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या गुन्ह्यात दोन मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली. ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे.

चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलाबा, ऑपेरा हाऊस, डोंबिवली, एन. एम. जोशी मार्ग, गिरगाव आणि दादर येथील चार कार्यालयासह तानिया आणि व्हेलेटिना यांच्याकरिता सर्च ऑपरेशन हाती घेतले.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी