मुंबई

विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

आत्मदहनाच्या प्रयत्नात हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला होता.

वृत्तसंस्था

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सुभाष भानुदास देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे सुभाष देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू असताना विधिमंडळाबाहेर हा प्रकार घडला होता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक