मुंबई

अंधेरीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक व कोठडी

बांगलादेशातील गरिबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

प्रतिनिधी

मुंबई - अंधेरीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. अब्दुल अव्यल अन्सार शेख आणि रहिम मोहम्मदअली शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बांगलादेशातील गरिबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अंधेरी परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून ते नोकरीनिमित्त अंधेरीतील सहार रोड आणि नवीन नागरदास रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर बुधवारी पोलिसांनी गोखले ब्रिजजवळ अब्दुल शेख या २६ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गेल्या एक वर्षापासून तो मुंबईत वास्तव्यास होता. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी रहिम शेख याला अटक केली. तो मूळचा ढाकाचा रहिवाशी असून मंगळवारी तो पिंकी सिनेमागृहाजवळ आला होता. ही माहिती मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी