मुंबई

चोराला चोर म्हणणे गुन्हा; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

प्रतिनिधी

मानहाणी प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला. त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यभर या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. अशामध्ये आता उद्धव ठाकरे यांनीदेखील याबद्दल टीका करताना, "चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे" असे म्हणत टोला लगावला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले की, "चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे फिरत आहेत आणि राहुल गांधींना शिक्षा ठोठावली गेली आहे. लोकशाहीचे हे हत्याकांड असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून आता फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल." अशी टीका त्यांनी केली आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?