फोटो सौजन्य : फेसबुक (Vasai Vaibav)
मुंबई

वसईत शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला; बनावट तृतीयपंथींच्या वेशातील चौघांना स्थानिकांकडून चोप

वसईतील पापडी-मुलगाव परिसरात दोन शाळकरी मुलींना फसवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Swapnil S

वसई : वसईतील पापडी-मुलगाव परिसरात दोन शाळकरी मुलींना फसवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृतीयपंथी वेशातील तीन पुरुष आणि एक रिक्षाचालक मिळून हे कृत्य करण्याच्या प्रयत्नात होते. तथापि, सतर्क नागरिकांनी चारही आरोपींना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना सोमवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास घडली. खोंचिवडे गावातील दोन अल्पवयीन मुली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना, पापडी-मुलगाव परिसरात एका ऑटोरिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांना थांबवले. तृतीयपंथी असल्याचा आभास निर्माण करत त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संवाद सुरू केला. त्यानंतर मुलींना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरिक सतर्क झाले. नागरिकांनी चौघांनाही पकडले आणि मारहाण करत वसई पोलिसांच्या हवाली केले. आरोपींमध्ये शरद शिंदे, संजय गोलंकार, निलेश मांदवकर (तिघेही तृतीयपंथी वेशात) आणि रिक्षाचालक सूरज माटोल यांचा समावेश असून, सर्वजण ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील रहिवासी आहेत. या चारही आरोपींकडून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी तृतीयपंथीचा वेष परिधान करून परिसरात भीक मागण्याच्या बहाण्याने फिरत होते. मात्र याआधीही त्या परिसरात ते संशयास्पद हालचाली करत होते.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

Bhiwandi Building Collapse : धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; महापौरांचे आदेश