मुंबई

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; तलाव १०० टक्के भरले

विहार व तुळशी या दोन तलावांतून अशा एकूण सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ९९.३२ टक्के म्हणजेच १४ लाख ३७ हजार ४६७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुरेल इतका हा साठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या मुंबई शहराबाहेरील (ठाणे जिल्हा परिसर) पाच तलावांतून आणि मुंबईतील विहार व तुळशी या दोन तलावांतून अशा एकूण सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, मुंबई महापालिका आपल्या ठाणे, भिवंडी व निजामपूर महापालिका हद्दीत दररोज १५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते.

मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी पावसाळा संपल्यावर म्हणजे दरवर्षीच्या १ ऑक्टोबरच्या सुमारास सात तलावांत १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. १३ सप्टेंबर २०२२ रोजी सातही धरणांत १४ लाख ३७ हजार ४६७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे व त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक